Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

माऊलीजींचा परीचय...

परिपूर्ण जीवनशैलीचा संदेश

आजच्या वेगवान, तणावपूर्ण आणि अनिश्चिततेने भरलेल्या जीवनात प्रत्येकाला असा मार्ग हवा असतो जो मन, शरीर आणि विचार तिन्हींचा सुंदर समतोल साधू शकेल.
तो मार्ग म्हणजे ज्ञानयोग……

ज्ञानयोग हे फक्त साधनेचे माध्यम नाही, तर जीवन जगण्याची एक अनोखी जीवनशैली आहे आणि ह्या जीवनशैलीचे संस्थापक , मार्गदर्शक आणि सकारात्मक जीवनशैलीचे प्रेरणास्थान म्हणजेच प. पु. माऊलीजी.

थेट हृदयाशी संवाद साधणारी भाषा व सुशिक्षितांपासून अशिक्षित लोकांनाही सहज समजेल अशी रसाळ अमृतवाणी, फक्त दर्शनानेच नयन, मन, आत्मा तृप्त व्हावे असा प्रेमळ, गोड, सात्त्विक चेहरा, उच्च विचार पण, अतिशयं साधे राहणीमान, सर्वांना हवं हवंस वाटणारं नम्र, लोभस व्यक्तिमत्व ही माऊलीजींची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये.
ज्ञानयोगाचा प्रसार आणि समाजातील प्रत्येक स्तरावर सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच माऊलीजींचे खरे ध्येय आहे.

Image

ज्ञानयोग – जीवन परिवर्तनाची दिशा

माऊलीजींचा मुख्य संदेश साधा पण अत्यंत प्रभावी आहे:
“जीवनशैली आणि विचारशैली बदलली तर संपूर्ण जीवन बदलते.”

ज्ञानयोग जीवनशैली तीन आधारांवर उभी आहे:

१.⁠ ⁠दैनिक साधना (ध्यान, प्राणायाम, योग)
२.⁠ ⁠गोपाळकला (सात्त्विक, पौष्टिक, संतुलित आहार)
३.⁠ ⁠सकारात्मक विचारसरणी.

या तीन गोष्टींच्या साहाय्याने माणूस वैयक्तिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, वैचारिक आणि सामाजिक पातळीवर संपूर्ण बदल अनुभवतो.

माऊलीजींची वाटचाल

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी माऊलीजींनी आपले घर, व्यवसाय आणि सर्व वैयक्तिक सोयी एका मोठ्या उद्दिष्टासाठी बाजूला ठेवल्या…..

जगभर वाढणारे व्यसन, ताण – तणाव , आजार, अंधश्रद्धा, नात्यांतील तुटणारी नाळ ही परिस्थिती बदलण्यासाठी माऊलीजींनी चैतन्य वन येथून ज्ञानयोगाची निर्मिती केली. आज हे छोटे रोप एक विशाल, सर्वांना सावली देणारे वृक्ष बनले आहे.

माऊलीजी मागील अनेक वर्षांपासून ज्ञानयोग ध्यान शिबिर पूर्ण करणाऱ्या साधकांना व्याधीमुक्त, व्यसनमुक्त, तणावमुक्त आणि आनंदमय जीवनाची यात्रा घडवत आहेत. केवळ ज्ञान देणे हा त्यांचा उद्देश नसून प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आईचं प्रेम हृदयात ठेवून ती ममता भरभरुन वाटणारे व क्षणभरात सर्वांना आपलेसे करून जिव्हाळा निर्माण करणारे माऊलीजी आज लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीचे बनले आहेत. सर्व साधकांच्या शब्दांत, डोळ्यात व हृदयात फक्त आणि फक्त माऊलीजीच राहतात.

माऊलीजींचे सोपे, वैज्ञानिक आणि सर्वांना समजणारे मार्गदर्शन म्हणजे त्यांची साधी भाषा, स्पष्ट विचार आणि 100% अनुभवावर आधारित मार्गदर्शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते समाजसेवक, डॉक्टर, पोलीस अधिकारी, व्यावसायिक, गृहिणी असे उच्चशिक्षित आणि अशिक्षित ही त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात.

त्यांच्या सत्संगात अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक जीवनशैली यांचे सुंदर एकत्रीकरण दिसते.

त्यातून प्रत्येकाला नवी दृष्टी मिळते – कसा विचार करावा, कसे बोलावे, कसे जगावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला ओळखावे कसे…. माऊलीजीचा प्रत्येक शब्द, प्रत्येक अनुभव हा आत्मविश्वास, श्रद्धा आणि विवेकाने परिपूर्ण असतो.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, चहा, कॉफी, मांसाहार यांसारख्या व्यसनांचा त्याग करून निरोगी आयुष्य स्वीकारले आहे. यापलीकडे जाऊन मानसिक आरोग्य देखील साधकांना लाभले आहे.

ते प्रत्येक गोष्टीची वैज्ञानिक कारणे स्पष्ट करतात.
ते सांगतात की देव नुसता मंदिरात नाही तर आपल्या विचारात, मनात आणि कृतीत सुद्धा आहे.
हा दृष्टीकोन तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना विशेष आपलेसे करतो, कारण त्यांना केवळ भाषण नव्हे तर प्रॅक्टिकल मार्ग हवा असतो.

सर्व वयोगटांसाठी प्रेरणा

लहान मुले

माऊलीजींची शिकवण यामुळे त्यांच्यातील स्वप्ने, कल्पनाशक्ती, जिज्ञासा आणि उत्साह यांना नवीन दिशा मिळते.. भावनिक संतुलन वाढते आणि मोठ्यांचा आदर करणे, सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन मिळते.

तरुण पिढी

स्वप्नांना दिशा, उद्दिष्ट निश्चित करायला मदत, आत्मविश्वास व तणाव कमी, नकारात्मक सवयींपासून दूर, करिअर प्रेशर आणि भावनिक प्रसंग साठी माऊलीजींचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते. युवकांच्या भाषेत सांगायचे तर इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा होते.
युवांना ते रोल मॉडेल म्हणजेच आदर्श वाटतात.

प्रौढांसाठी

काम, घर, नातेसंबंध यातील ताण कमी करून त्यात स्पष्टता, मानसिक दृढता, नवे विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन देऊन ते जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतात. निर्णयक्षमता आणि मानसिक स्थिरता वाढते.

वयोवृद्ध

जगण्याची नवी उमेद, शांती, समाधान आणि प्रेमाने परिपूर्ण वातावरण निर्माण होते, ज्यामुळे त्यांना पुन्हा तरुणपणाची अनुभूती मिळते.

माऊलीजींचे ध्येय अत्यंत स्पष्ट आहे:

ते म्हणजे समाजाला निरोगी, औषधमुक्त, तणावमुक्त, चिंतामुक्त, व्यसनमुक्त, अंधश्रधामुक्त, हसत खेळत आनंदी, उत्साही, नात्यांमधील सुंदरता जपणारे आणि सकारात्मक जीवनाकडे नेण्याचा संकल्प.
ते नकारात्मक आहारापासून शरीराला होणारी हानी ह्याबद्दल जागरूक करतात.

माऊलीजी ध्यान, प्राणायाम आणि योगसाधनेला गंभीरतेपासून आणि अहंकारापासून दूर करुन प्रेमाच्या मार्गाने हसत-खेळत शिकविणारे आणि प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्तीचा अनुभव करून देणारे आगळे वेगळे मार्गदर्शक आहेत..
माऊलीजी इतक्या कमी वयातच आपल्या हृदयस्पर्शी स्वभावाने करोडो लोकांना जोडणारे आणि आपल्या प्रेमाच्या धाग्यामध्ये सर्वांना गुंफून ज्ञानयोगाचा विशाल परिवार निर्माण करणारे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
त्यांचे विचार अनेकांना आजारमुक्त जीवनाचा अनुभव देतात.
ज्या साधकांनी ज्ञानयोग जीवनशैलीचे अनुकरण केले त्यांनी डायबिटीज, बीपी, थायरॉईड, गर्भाशयाचे प्रॉब्लेम, डिप्रेशन, एंग्जायटी, मायग्रेन, वर्टिगो, सायटिका,पाठीचे आणि पोटाचे विकार, सांधेदुखी, वात पित्त कफ, यासारख्या असंख्य समस्या सुधारल्याचे अनुभव सांगितले आहेत.

मनाचा अभ्यास – मानसिकता

माऊलीजी माणसाचे मन सूक्ष्मतेने समजून घेतात.
खूप साधकांचे म्हणणे आहे की:
“ज्ञानयोगाशी जोडल्यावर अनेक समस्या आपोआप सुटू लागतात.”
कारण माऊलीजी विचारांवर काम करतात..
आपले विचार जितके शुद्ध, तितके जीवन सुंदर.

ज्ञानयोग – एक परिवार

माऊलीजी हे प्रचंड ज्ञानाचा सागर आहेत. त्यांचा पुरातन धर्मग्रंथापासून अत्याधुनिक विषयाचा छान अभ्यास आहे. माऊलीजींनी विविध विषयांवरील हजारो जीवनोपयोगी सत्संगांची निर्मिती आपल्या ज्ञानातून केलेली आहे. सकारात्मक ऊर्जेचं वलय लाभलेल्या माऊलीजींच्या केवळ सानिध्यात राहून साधक औषध-गोळ्यांशिवाय सहजपणे सर्व रोगांमधून मुक्तीचा अनुभव घेत आहेत.
आज करोडो लोक माऊलीजींशी जोडले गेले आहेत:
विद्यार्थी, तरुण, शिक्षक, डॉक्टर्स, पोलीस, कर्मचारी, व्यावसायिक, गृहिणी अगदी सर्वांनाच माऊलीजींचे मार्गदर्शन वास्तविक, सोपे आणि परिणामकारक वाटते.
म्हणूनच वैद्यकीय शाखांपासून नामवंत डॉक्टर्स, नोकरदार, कंपन्या, दुकाने, व्यावसायीक, शिक्षण क्षेत्र, बँका, संस्था, तुरुंगातील कैदी, पोलीस अशा सर्वच क्षेत्रात माऊलीजींना मोठ्या प्रमाणात शिबीरासाठी आमंत्रित केले जात आहेत..

परिपूर्ण जीवनशैलीचा संदेश:

माऊलीजींच्या मार्गदर्शनाची खासियत अशी आहे की, ते आपल्या शब्दांमधून आणि कृतीतून एका सुंदर जीवनशैलीचा समतोल आराखडा तयार करतात.
दर महिन्याला चैतन्य वन येथे होणाऱ्या ६ दिवसीय निवासी शिबिरांमध्ये लोकांना जीवनाचा नवीन अनुभव मिळतो.
त्यांच्या सल्ल्यामुळे लोकांचे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक स्वास्थ्यातही चैतन्य प्राप्त होते. त्यांनी दाखविलेली मार्गदर्शक तत्वे आणि सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येकाला त्यांच्या आत्मविश्वासाला पुनःस्थापित करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास समर्थ बनतात. ते अधिक शांत, आनंदी, निरोगी आणि जागृत जीवन जगतात.

माऊलीजींचा संदेश एकच:

जीवन सुंदर आहे आणि आनंदी राहणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे फक्त योग्य जीवनशैलीची गरज आहे.

ज्ञानयोग हा सकारात्मक, संतुलित आणि निरोगी आयुष्याची दिशा दाखवतो.

हा मार्ग सर्वांसाठी आहे विशेषतः तरुणांसाठी, जे उद्याच्या जगाचे निर्माते आहेत.

एक नवीन अध्याय

सुविचार

क्रोध करून त्या सर्व गोष्टी गमावू नका ज्या तुम्ही शांत राहून कमावलेल्या आहेत.. माऊलीजी

वाईट सवयींमुळे आपल्या माणसांना सोडण्यापेक्षा, आपल्या माणसांसाठी वाईट सवयींना सोडा.. माऊलीजी

तुम्हाला जे वाटेल ते करा.. पण एवढे पक्के लक्षात ठेवा की..कर्म कधीच पत्ता विसरत नाही.. माऊलीजी

ब्लॉग

जीवन दुःख का देते?

एका वया नंतर जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेले असते.. अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचे काहीच वाटेनासे होते.  

Read More »

खरे प्रेम

बांधून ठेवलं म्हणून कोणी कोणाशी जोडल्या जात नाही.. बांधीलकी असेल तर कोणी कोणापासून दूर जात नाही..   तुझ्यावर उपकार म्हणून

Read More »

व्हिडिओ

दिवसाची सकारात्मक सुरुवात!

सकाळची साधना

दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा

प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.

Scroll to Top