माझं नाव अक्षय भबुतकर आहे. मी धामणगाव रेल्वे अमरावती मध्ये राहतो. अनुभव सांगायचं झालं तर मला खूपच जास्त ज्ञानयोग मुळे माझ्या जीवनात बदल झाले. मला माझा व्यवसायात खूप जास्त लॉस होत होता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स ची खूप जास्त कमी होती आणि मी फक्त माउलीजींचे शिबिर यासाठी जॉईन केली होती की मला माझ्या व्यवसायात प्रगती झाली पाहिजे आणि चांगले मला पैसे कमावता आले पाहिजे. माऊलीजिचे व्हिडिओ मी खूप आधीपासून बघत होतो परंतु निवासी शिबिर मी कधी जॉईन नाही केले. तर विचार मनात आला कि एकदा बघून तर येऊया त्यामुळे बघण्यासाठी फक्त मी ते निवासी शिबिर जॉईन केले आणि माझं जीवन संपूर्ण बदलून गेले. मला माझ्या व्यवसायात जो लॉस होत होता तो लॉस होणे बंद झाल, खरंतर मला सर्व गोष्टी येत होत्या परंतु माझ्यात आत्मविश्वासाची कमी होती त्यामुळे ते काम मी करत नव्हतो हा सर्वात मोठा माझातला फॉल्ट होता तर ज्ञानयोग मुळे आत्मविश्वास वाढला कॉन्फिडन्स वाढला प्रत्येक नवी संधी मी घेत होतो आणि असं करता करता माझा बिझनेस आणखी जास्त वाढला. बिझनेस सोबतच माझ्या काही वाईट सवयी होत्या आणि मला अजिबात सोडायच्या नव्हत्या कारण कोणत्या वाईट सवयी मुळे मला काही तोटा होत नव्हता परंतु माउलींजी सोबत जोडलो आपल्या ज्ञानयोगा सोबत जोडलो त्यामुळे ज्या वाईट सवयी होत्या मी नॉनव्हेज खूप खात होतो चिकन मटन आणि चहा मी दिवसातून पाच ते सहा कप पियायचो आता मला तीन ते चार वर्ष झाले मी चहाला हात सुद्धा लावलेल्या नाही नॉनव्हेज सुद्धा खाल्लेले नाही आणि असा खूप साऱ्या वाईट सवयी माझा एकदम बंद झाल्या. खरंच मित्रांनो एकदा निवासी शिबिर जॉईन करून बघा तुम्हाला एक नवीन अनुभूती येणार जे तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही. जय गुरुदेव.
Santosh More
प्राणायाम, ध्यान, आणि योगामुळे तणाव मुक्ती, उत्तम आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. नियमित साधना तुम्हाला शांत, आनंदी आणि यशस्वी जीवनाकडे घेऊन जाते.